गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे.महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विषयी माहिती.

विठ्ठल रामजी शिंदे
जन्म        - २३ एप्रिल १८७३.
जन्मगाव   - जामखंडी (कर्नाटक ).
शिक्षण     - बी ए .
मृत्यू        - २ जानेवारी १९४४.
     ' प्रत्येक देव जर जरी अस्पृश्यता पाळायला लागला,तर मी त्याला देव मानणार नाही 'असे लोकमान्य टिळक म्हणत.' हिंदू धर्मात अस्पृश्यतेला जागा नाही 'असे महात्मा गांधींनी १९२० च्या नागपूरच्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेत म्हटले होते. अशा परिषदा, भाषणे ज्यांच्या प्रेरणेने संपूर्ण भारतात होत होती, ते प्रेरणास्थान होते 'विठ्ठल रामजी शिंदे '.
       विठ्ठल रामजी शिंदे यांच्या घरी कोणीच भेदाभेद पळत नव्हते.घराची दारे सर्वांसाठी खुली होती. विठ्ठल रामजी शिंदे १८९१ मध्ये मॅट्रिक पास झाले.नंतर पुढील शिक्षणासाठी ते मँचेस्टर ला गेले.तेथे काही काळ राहिल्यावर भारतात परतले.भारतात ते प्रार्थना समाजाशी जोडले गेले.त्यांना देशातील अस्पृश्यता नष्ट करायची होती.पण या कामात प्रार्थना समाज आडवा येत होता.म्हणून त्यांनी प्रार्थना समाज सोडला आणि त्यांनी डिस्प्रेस क्लास मिशन चे कार्य सुरू केले.
       पुढे त्यांनी १९१२ मध्ये मिशन चे कार्यालय मुंबई हुन पुण्याला हलवले.पुण्यात त्यांना तुकोजी होळकर,रँग्लर परांजपे यांचे सहकार्य लाभले.संस्था प्रगती करत होती.पण काही सनातनी लोकांना त्यांचे अस्पृश्यता निवारण्याचे कार्य पटले नाही.हरीजनांची सेवा हरीजनांनीच करावी इतरांनी नव्हे असे म्हणून सनातनी लोक त्यांच्यावर दबाव टाकू लागले.म्हणून त्यांनी संस्थेत काम करणे सोडून दिले.तिचा कारभार एका नियामक मंडळावर सोपवला.त्यांच्या ह्या त्यागी वृत्तीमुळे त्यांना महर्षी ही पदवी प्राप्त झाली.
        मिशनचे कार्य सोडल्यावर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ब्राम्हो समाजाचे कार्य करू लागले.ते दक्षिणेत त्रावणकोट ला गेले.तेथे त्रावणकोट संस्थानातील वायक्कम या गावचा मंदिर प्रवेश खूप गाजला.या मंदिरात अस्पृश्य सोडून सर्वाना प्रवेश करता येत होता.त्याला या सत्याग्रहाला गांधीजी पाठिंबा देतील असे त्यांना वाटले होते.पण त्यांची ही आशा फोल ठरली.
       महर्षींनी याविषयी गांधीजींना परखड शब्दात सुनावले.त्यांनी गांधींना पत्र लिहिले आणि म्हटले " तुमच्या मनात खादीला पाहिले ,हिंदू मुस्लिमाना दुसरे आणि अस्पृश्यतेला शेवटचे स्थान आहे पण माझ्या मनात अस्पृश्यता निवरण्याला पहिले स्थान आहे ". 
       कर्नाटकच्या सीमेवर आढळणारी देवदासी आणि मुरळी ची प्रथा सोडवण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले.यासाठी त्यांनी त्यांच्या जन्मगावचा रोष पत्करला.त्यांना गाव सोडावे लागले.समाजकार्यासोबतच ते राजकारणात पण पुढे होते. १९३० च्या सविनय कायदेभंगात त्यांना सहा महिने कारावास सुद्धा झाला होता.कारागृहात आजारी पडले.त्यांनी सुटकेसाठी कोणताही लाचारी पत्करली नाही.
      कारागृहात असताना त्यांनी आपल्या आठवणी लिहून ठेवल्या.खूप आजारी पडले.ठक्करबाप्पा, कर्मवीर भाऊराव पाटील असे अनेक लहान थोर समाजसेवक त्यांना भेटायला येत.त्यांच्या आयुष्याचे शेवटचे दहा-बारा वर्षे आजारपणात गेले.१९३४ साली मुंबईतील संस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना मानपत्र दिले. २ जानेवारी १९४४ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

६ डिसेंबर १९५६ डॉ.बाबासाहेब आंबेस्कर यांचे महापरिनिर्वाण.

        डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या समाजाने भारतीय समाजव्यवस्थेमुळे खूप हाल अपेष्टा झेलल्या.त्यांचा आणि त्यांच्या समाजाचा एकच गुंन्ह...